बांगलादेश हे भारताच्या पूर्वेला असलेले बंगाली भाषिक मुस्लिम राष्ट्र आहे. १९४७ सालच्या अखंड भारताच्या फाळणीत पूर्व आणि पश्चिम अश्या दोन भागात पाकिस्तानची निर्मिती झाली. त्यातला पूर्व भाग हा आजचा बांगलादेश म्हणून ओळखला जातो. तत्कालीन पूर्व पाकिस्तानाची भाषा बंगाली, तर पश्चिम पाकिस्तानात उर्दू वापरात होती. भाषा आणि इतर प्रश्नामुळे पूर्व पाकिस्तानातील जनतेचा असंतोष वाढत गेला. हा असंतोष मोडून काढण्यासाठी पाकिस्तान सरकारने लष्कर पाठविले व लष्करी कायदा लागू केला. पाकिस्तानी लषकराच्या मोहिमेमुळे आणि तणावाच्या परिस्थितीमुळे पूर्व पाकिस्तानातील नागरिकांचे भारतीय हद्दीत मोठ्या प्रमाणात स्थलांतर होऊ लागले. परिणामी भारताला या प्रकरणात लष्करी हस्तक्षेप करावा लागला. १९७१ मध्ये पूर्व पाकिस्तान वेगळे होऊन बांगलादेशाची निर्मिती झाली.
बांगलादेश हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या.
'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे.
बांगलादेशमध्ये सहा प्रशासकीय प्रभाग आहेत - बारिसाल, चित्तागॉँग, ढाका, खुलना, राजशाही व सिलहट. हे प्रभाग ६४ जिल्ह्यांमध्ये विभागण्यात आले आहेत. प्रत्येक जिल्ह्यात अनेक उपजिल्हे असतात तर उपजिल्ह्यांची थाना या प्रशासकीय एककात विभागणी करण्यात आली आहे.
मोठी शहरे
ढाका बांगलादेशची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. चित्तागॉँग, खुलना, राजशाही, बारिसाल व सिलहट ही इतर मोठी शहरे आहेत. ही शहरे महापौर निवडतात तर इतर शहरांतून नगराध्यक्ष असतो. दोघांची निवड पाच वर्षांसाठी असते.
कॉक्स बझार जवळचे मासेमार. बांगलादेशमधील अनेक उद्योग अजूनही मागासलेलेच आहेत.
बांगलादेश आर्थिकदृष्ट्या विकसनशील देश आहे.[२] येथील नागरिकांची सरासरी वार्षिक कमाई २,३०० अमेरिकन डॉलर आहे. जगातील ही सरासरी १०,२०० अमेरिकन डॉलर आहे.[३]